Skip to main content

Posts

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं. एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत. खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं? कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल? म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही. हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे. आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो आणि

अयोध्या आणि मी

लहान असताना cds सोबत खेळायला आवडायचं काय माहीत का☺️ खेळत असताना एक कोरी CD सापडली, त्याच्यावर कोणतंच नाव नव्हतं लिहिलेलं, मग त्या videocon च्या CD Player वरती ती लावली, Black and white मध्ये काहीतरी विडिओ चालू झाला, त्याला आवाज नव्हता, फक्त विडिओ. माणसं इकडं तिकडं पळत होती, कोणीतरी कुठल्यातरी इमारतीवर चढून बसलेलं, नुसता दंगाच दिसत होता. बाबांना तो व्हिडीओ दाखवला मग बाबा म्हणाले की हा अयोध्येचा आहे.  अयोध्येचा व्हिडिओ? मग तो व्हिडिओ पुन्हा पहिल्यापासून लावला, दादांना दाखवला, दादा म्हणजे माझे आजोबा. दादांनी मग एक एक करून प्रत्येक गोष्ट सांगायला चालू केली. अयोध्येचा नक्की विषय काय, संघर्ष काय आणि निकाल? (तेव्हा अजून निकाल लागायचा होता) प्रत्येक गोष्ट नीट सविस्तर कळली आणि मग घरात एक जुनी विट बाबांनी काढून दाखवली आणि मग म्हणाले "ही विट आयोध्येची, विवेक गेलेला तेव्हा त्याने आणली"  (विवेक म्हणजे माझा काका) विवेक काका कारसेवेला गेलेला? तो होता ती मशीद पाडली तिथे? किती भाग्यवान!  नुसता तोच भाग्यवान नाही तर आपण सगळेच किती भाग्यवान की त्याच्या सहवासात आपण राहतोय. मग विवेक काकाकडून ऐकलेल

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय. माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला? कुठेतरी काहीतरी हरवतेय,  मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय. काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे... नक्की ओळखायचं तरी कसं? पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का? काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत? माणसं ओळखायची?? एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील. कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे. कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का? आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय? कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती? "बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते" हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं?  मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आपला

पहिली भेट

आठवते का आपली पहिली भेट? प्रथम तुज पाहता, काय सांगू काय झाले, तुझ्या नजरेने काळीज माझे घायाळ केले. नक्की प्रेम म्हणजे काय हे कळण्या आधीच प्रेमात पडलो, तुझ्या ओठांत मिसळत येणाऱ्या शब्दात मी अडकलो. तुला पाहताना जीव वेडावून गेला,  तुझे बोल ऐकताना कान तृप्त झाला! पाहता क्षणी वाटले की हीच ती, माझी life Partner, हिच्यासोबत असेल संसार माझा, कोणालाच नाही ही सर. भेटताना तुला वाटले आवडेन का मी तुला? तुझ्या आयुष्यात मिळेल का जागा मला? पण, तू होकार दिलास आणि सगळच खर झालं. सुख, सुख म्हणजे काय नक्की हे मला दिसलं. तू आणि मी एकच झालो,  तुझ्यासोबत आयुष्याचा सोबती मी झालो. आठवते का आपली पहिली भेट? तीच आठवत आठवत आत्ता, तुझ्यासाठी केलेली, तुझी च ही कविता सुचली.

पाऊस मला म्हणाला एकदा!

पाऊस मला खुणावतोय, म्हणतोय बघ मी कसा आहे, थांबतो का कोणासाठी, मला हवं तस मला हवं तिथं माझा मी पडून जातो. मला नाही बंधन कोणतं, अगदी धरणं फोडू शकतो, पाऊस आहे मी, वाऱ्यासोबत तांडव करू शकतो. मग उडते तारांबळ सबंध पृथ्वी लोकाची, घर, महाल किंवा तुमची फॅक्टरी पर्वाच नाही कशाची. रौद्र रूप पावसाचे पाहून मीच थोडा बावरा झालो, विषय थोडा गंभीर वाटला म्हणून थोडा थांबलो. अरे हो हो म्हणालो, माहीत आहे तुझा प्रताप, असाच हैराण करून होतोस मधूनच कटाप. बघ थोडी माझीही स्थिती तू जाणून घे, मन दुबळे असेल तरी भाव माझे समजुन घे, नाही बाबा माणसाला अस मनसोक्त उडता येत, कितीही झेपावल तरी नाही तसं सांभाळता येत. जबाबदारीचे दोर असतात पायात बांधलेले, किती ही म्हणलं तरी त्याचे पाश असतात मनाला कसलेले. तुझ सगळं मान्य आहे, तूच निसर्गाचा राजा, आम्ही शुल्लक मानव जीव, आमची हीच सजा!

काय बोलावे

 काय बोलावे मला कळतच नाही, की ऐकावे नुसते ते सुचतच नाही.. अवघे सारे दुःख माझे व्यक्त कधी होत नाही, परक्याच्या ह्या वेदेनेचे अर्थच मुळी समजत नाही... विषय गंभीर तरी बेजार सर्व काही सुन्न सुन्न, उमजत नाही तसं आता बोलावे की ऐकावे हे सुचतच नाही... कोण मजला पाहिले अन बोलले की त्रस्त आहे, माहिती रे त्रस्त मी तरी उपाय कोणी सुचवला एकही नाही! पाहिजे ते पाहिले प्रत्येकाने, दुवा मी जोडवला नाही, पाहिले पण योग्य तो पाठिंबा मज लाभला नाही...! हा की तो, मी पाहूनी थकलो आता, हा की तो, की मी ह्यातच अडकलो आता, संपले नाही जीवन तरी अडखळला प्राण माझा... हाच आहे का प्रसंग, संपते अनंत इथे नाही?

पाडव्याचा महोत्सव

गुढी पाडवा म्हणजे नक्की काय? फक्त गुढी? कडूलिंब, नवीन साडी, उलटा केलेला गडू. आणि एक काठी? पुरणपोळी कि मग आमरास पुरी? पंचपक्वान्न की साधा गोडाचा शिरा.? श्री राम वनवासातून अयोध्येत परत येतात तो दिवस? कि मग ब्रम्ह देवाने ह्याच दिवशी हे विश्व तयार केल म्हणून हा महोत्सव? खर तर निसर्गाच निरीक्षण केल की कळत, का गुढी पाडवा ते. व पू काळे म्हणतात की जगण्याचा महोत्सव करता आला पाहिजे, आणि निसर्गाला जी पालवी फुटते ना त्याचाच असतो हा महोत्सव “गुढी पाडवा”. छोटी छोटी झाडे सुद्धा हिवाळ्यातला कंटाळा होळीत झटकून, चैत्रातल्या नवीन पालवी साठी आतुरतेने वाट बघत असतात. आंब्याची झाडे मोहोराने भरून गेलेली असतात आणि कोकीळ शीळ घालायला चालू झालेला असतो. निसर्गात हे बदल होत असताना मग माणसाने मनांची कात टाकून नवीन संकल्प का करू नयेत? १ जानेवारीला केलेल्या Resolutions पेक्षा हे best नाही का? निसर्गासोबत आपणही नवीन पालवी ओढून घेऊ शकतोच की! पण अश्या सणांना आपल्या आजूबाजूला लोकांच्या वेगवेगळ्या तऱ्हा बघायला मिळतात. त्यात सगळ्यात पुढे असतात ते म्हणजे आदल्या रात्री Whatsapp वर शुभेच्छांचे status ठेवणार

Social Media